आरोग्यदायी जीवनासाठी शहाळ्याचे पाणी अमृत... वाचा हे आहेत गुणधर्म

Healthy life, Lose weight with coconut water
Healthy life, Lose weight with coconut water

नागपूर : सध्या वजनवाढीमुळे अनेक जण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण, वेळ नसल्याने व्यायाम करता येत नाही. डॉक्‍टरांनी दिलेली पथ्येही पाळता येत नाही. व्यस्त दिनचर्येतून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्‍य नाही. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. वजन वाढतं, हृदयाचे आजर, रक्तदाबासारखे इतर आजार सुरू होतात. पण, आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधेही तुमचे वजन कमी करू शकता. यामुळे तुमचे वजन आणि आरोग्यही सुदृढ राहू शकते.

वाढत्या वजनामुळे अनेक शारीरिक व्याधी बळावतात. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम, जिमपासून ते डायटवर कंट्रोल करतात. तरीही एवढी मेहनत करूनही काही लोक वजन कमी करू शकत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या असतील. अगदी ट्रिटमेंटसुद्धा घेतली असेल. पण, आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक साधा सरळ उपाय सांगणार आहोत.

नारळ पाण्याने वजन कमी करा

उन्हाळ्यात अनेक लोक नारळ पाणी पितात. पण, तुम्हाला माहिती आहे का नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळ पाणी शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर काढते. यामुळे तुमचे वजन जलद गतीने वाढते. याशिवाय दररोज नारळ पाणी प्यायलाने वजनही नियंत्रणात राहते.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ


नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे. यासाठी दररोज उपाशीपोटी नारळ पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता. याशिवाय व्यायाम करताना किंवा व्यायामानंतर, दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळी नारळ पाणी पिऊ शकतात. यामुळे तुमचे वजन कमी होते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.

नारळ पाणी पिण्याचे फायदे


रोज सकाळी नारळ पाणी पिल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते आणि यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता. जर तुमचे वजन वाढले असेल, तर नारळ पाणी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. प्रोटीन, खनिज आणि कॅल्शियम यामध्ये भरपूर असते. हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असते. म्हणजे पाण्यासोबत बाकीचे इतर पदार्थ खाण्याची आवश्‍यकता नाही. नारळ पाणी पिल्याने तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहू शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी इच्छुक आहात, तर सकाळी व्यायामानंतर, दुपारी जेवल्यानंतर आणि संध्याकाळी नारळ पाणी पिऊ शकतात.

किडनी विकारांवर फायदेशीर


वजन कमी करण्यासोबतच नारळ पाण्याचे सेवन थायरॉईड हार्मोन्स संतुलित ठेवते. यासाठी तुम्ही सकाळी नारळ पाणी पिऊ शकता. किडनीच्या आरोग्यासाठी नारळ पाणी फायदेशीर आहे. हे युरीनरी ट्रॅकला स्वच्छ करून किडनी स्टोनही काढते. याशिवाय नारळ पाण्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनही होणार नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत नारळ पाण्याचे सेवन तुम्हाला डिहायड्रेशनपासून वाचवते. तसेच त्वचेला पोषण देण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर आहे. तुमचे सौंदर्य या नारळ पाण्यामुळे खुलून दिसेल यात शंकाच नाही. वाट कशाची पाहताय नारळ पाणी पिण्यास आजच सुरवात करा आणि तुमचे आरोग्य निरोगी बनवा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com