चेतना तरंग : अंतर्मनात डोकवायला शिका... 

sri-sri-ravishankar
sri-sri-ravishankar

प्राचीन काळच्या लोकांना आणि माझ्या पाहण्यात आलेल्या स्वामींना, साधूंना इतरांच्या भांडण-तंट्यात स्वारस्य नसायचे. त्यांच्याकडे कोणी तक्रार घेऊन गेल्यास ते सरळ कानावर हात ठेवायचे आणि म्हणायचे, ‘‘तुमचे तुम्ही बघून घ्या.’’ तुम्ही एखादा प्रश्न सोडविण्यात गुंतलेले असल्यास तुमची ऊर्जा उच्च पातळीवर असते, पण तुम्ही प्रश्‍नांवर चर्चा करत राहिल्यास ऊर्जेची पातळी खाली येते. 

या जगात नेहमीच सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा खेळ चालू असतो. जीवनात कधी प्रश्न येतात, आव्हाने स्वीकारावी लागतात, पण त्याच्या मागोमाग त्या प्रश्नांची आणि आव्हानांची उत्तरे येत असतात. पूर्वीच्या काळात लोकांचे सगळे लक्ष ऊर्जेची पातळी वरच्या स्तरावर ठेवण्याकडेच असायचे. अशा स्थितीत लोक तुमच्याकडे आल्यास त्यांचे प्रश्न आपोआप सुटतात. लोक त्यांच्या समस्यांविषयी तुमच्याजवळ बोलताना काय होते? तुम्ही त्यांच्या प्रश्नात गुरफटता, वाहवत जाता. असे होऊ नये यासाठीचा उपाय ः प्रत्येकाला तुमच्याकडे येऊन १०० गोष्टी सांगू दे, पण तुम्ही त्यावेळी तुमचे लक्ष ऊर्जेला वरच्या पातळीवर ठेवण्यासाठी एकवटा. तुमचे मन अंतर्मुख होऊन दे, लक्ष अंतर्मनाकडे असू दे, आजूबाजूला काय घडते आहे याची पर्वा करू नका. म्हणजे मग तुम्हाला अत्यंत मोकळेपणा जाणवेल. 

हा प्रयोग करून बघा. घरी तुमची सासू तुमच्या तक्रारी करत असेल, तुमचा नवरा करत असेल, कोणी कितीही तुमच्याबद्दल तक्रारी केल्या, जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तरी एकाच गोष्टीला मनात घट्ट चिकटून बसा. ‘‘काही झाले तरी मी माझी ऊर्जा वरच्या पातळीवरच ठेवीन, तिला खाली घसरू देणार नाही.’’ असे वागून मग काय होते ते बघा. नाना प्रश्न आणि आव्हाने उभी राहिल्यास मनाला अंतर्मुख बनवा. आपण काय समस्या उभ्या राहताच त्यांचा पाठलाग करीत नको त्या दिशेला भरकटत जातो आणि मग आपल्या ऊर्जा-शक्तीचा ऱ्हास होतो. 

बऱ्याचवेळा एखाद्याला दयाळूपणा दाखवताना आपणच गलितगात्र होतो. खरेतर समस्या सोडविण्यासाठी तुमच्या दयेचा उपयोग होत नाही, उलट प्रश्नांची गुंतागुंत वाढते! प्रश्न उभे राहिल्यावर एखाद्याने खरेतर अंतर्मुख व्हायला पाहिजे, अंतर्मनात डोकवायला पाहिजे आणि वैराग्यभावाने मनःशांतीची अनुभूती घ्यायला पाहिजे. प्रत्यक्षात तुम्ही त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करता, त्याला सहानुभूती दर्शविता, त्याचे सांत्वन करता. संकटात सापडलेल्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग भोगू दे. तुम्ही दु:खी व्हायचे का आनंदी राहायचे, हे प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहे. तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असल्यास तुमची कर्मे बदला. अशा दृष्टिकोनामुळे माणूस अधिक स्वावलंबी बनतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com