पुन्हा साथ देवूया.. चला, पंचगंगा वाचवूया..; कोल्हापूरकर सरसावले

जिल्ह्याची जीवनदायिणी असलेल्या पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी सव्वा दोनशे कोटींचा निधी
sakal
sakalsakal
Updated on
Summary

जिल्ह्याची जीवनदायिणी असलेल्या पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी सव्वा दोनशे कोटींचा निधी दिला जाईल आणि येत्या तीन वर्षात पंचगंगा निर्मळ व प्रदूषणमुक्त केली जाईल, अशी ग्वाही आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ'च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पुन्हा साथ देवूया, चला, पंचगंगा वाचवूया‘ मोहिमेंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे स्वागत आज येथील पंचगंगा घाटावर झाले.
तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ'च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पुन्हा साथ देवूया, चला, पंचगंगा वाचवूया‘ मोहिमेंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे स्वागत आज येथील पंचगंगा घाटावर झाले.
अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. दरम्यान, शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तीन पिढ्या यानिमित्ताने एकवटल्या आणि हजारो हातांनी पंचगंगा घाटाची स्वच्छता करून ही मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. दरम्यान, शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तीन पिढ्या यानिमित्ताने एकवटल्या आणि हजारो हातांनी पंचगंगा घाटाची स्वच्छता करून ही मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, रिझर्व्ह बॅंकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. जलदिंडीचे स्वागत झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन झाले.
सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, रिझर्व्ह बॅंकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. जलदिंडीचे स्वागत झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन झाले.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. जय सामंत यांनी जल संवर्धन प्रतिज्ञा दिली. ‘सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर यांनी स्वागत केले.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. जय सामंत यांनी जल संवर्धन प्रतिज्ञा दिली. ‘सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर यांनी स्वागत केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, डीवायपी सिटी, मॉंटेक्यू लाईफस्टाईलचे सिध्दार्थ साळोखे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे, उप-प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, डीवायपी सिटी, मॉंटेक्यू लाईफस्टाईलचे सिध्दार्थ साळोखे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे, उप-प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने आदी उपस्थित होते.
लवकरात लवकर ठोस कार्यवाही होणे अपेक्षित आहे. कारण हा प्रश्न तितका सोपा नाही. सर्वच घटकांनी मिळून त्यासाठी काम केले पाहिजे. राजर्षी शाहूंचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्यास नक्कीच यश येईल, असे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगतिले.
लवकरात लवकर ठोस कार्यवाही होणे अपेक्षित आहे. कारण हा प्रश्न तितका सोपा नाही. सर्वच घटकांनी मिळून त्यासाठी काम केले पाहिजे. राजर्षी शाहूंचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्यास नक्कीच यश येईल, असे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगतिले.
पंचगंगेच्या इतिहासात 
‘सकाळ'चे सुवर्णपान 
पंचगंगेला खूप मोठा इतिहास आहे आणि पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी लोकसहभागातून ‘सकाळ'ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
पंचगंगेच्या इतिहासात ‘सकाळ'चे सुवर्णपान पंचगंगेला खूप मोठा इतिहास आहे आणि पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी लोकसहभागातून ‘सकाळ'ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
व्यासपीठावर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ‘गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.
व्यासपीठावर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ‘गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.
भविष्यात जेंव्हा केंव्हा पुन्हा एकदा पंचगंगेचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी त्यामध्ये ‘सकाळ'चे योगदान सुवर्णअक्षरांनी नोंदवले जाईल, असे गौरवोद्गगार यावेळी मान्यवरांनी काढले
भविष्यात जेंव्हा केंव्हा पुन्हा एकदा पंचगंगेचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी त्यामध्ये ‘सकाळ'चे योगदान सुवर्णअक्षरांनी नोंदवले जाईल, असे गौरवोद्गगार यावेळी मान्यवरांनी काढले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com