राम मांसाहारी की शाकाहारी? भालचंद्र नेमाडेंची वादात उडी; वाल्मिकीच्या रामायणाबाबत विचारला प्रश्न

Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेबाबत भाष्य केलं आहे. यावरुन वाद निर्माण केला जाण्याची शक्यता आहे.
Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki
Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki

जळगाव- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेबाबत भाष्य केलं आहे. यावरुन वाद निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. कोणता राम खरा मानायचा? वाल्मिकीचाच राम कशामुळे खरा? असा सवाल त्यांनी केला आहे. जळगावच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. (after ncp jitendra awhad writer bhalchadra nemade statement on ramayan valmiki non veg)

खरा राम कोणता समजायचा? वाल्मिकीचा रामच खरा का म्हणायचा? आसाममधील एका समूदायाच्या रामायणात सीता मुख्य आहे. ती रामाला आज्ञा करत असते. रामाला शिव्या देत असते. तुला अक्कल नाही का? असं म्हणत असते. हे लोक आता फक्त १५ हजार राहिले आहेत. रामायणाच्या कथेचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे कोणते रामायण खरं समजायचं, असं ते म्हणाले.

Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki
Jitendra Awhad: "राम बहुजनांचे ते मांसाहारी होते"; जितेंद्र आव्हाडांचा वादग्रस्त दावा

रामायण कथेचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक कथेमध्ये विविधता आहे. वाल्मिकीच्या आधीही रामायण होते. ते बदलत बदलत वाल्मिकीपर्यंत आले. वाल्मिकी हा एका राजाच्या दरबारातील कवी होता. त्याने तेव्हा राजाला खूष करण्यासाठी त्याप्रमाणे रामायण लिहिले. देशाच्या विविध कोपऱ्यात त्यांच्या कथेमध्ये वेगवेगळा राम आहे. काही ठिकाणी सीता रावणाची मुलगी आहे. रामायण बदलत बदलत वाल्मिकीपर्यंत आले आहे, असंही ते म्हणाले.

Bhalchadra Nemade statement on Ramayan Valmiki
Annapoorani: आव्हाड बोलून गेले पण नयनताराच्या अन्नपूर्णानी विरोधात गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण?

लेखकाला न दिसणारे सत्य सापडले पाहिजे. राम मांसाहारी होता की शाकाहारी होता हे वाचूनच लक्षात येतं. वाल्मिकी सोडून इतर रामायण आपल्याला का वाचायला मिळत नाहीत? उत्तर मला माहितीये. पण, पोलीस प्रोटेक्शन असल्याने याव्यतरिक्त काही सांगणार नाही, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्यही केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावं लागेल.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com