जळगाव : भुयारी गटारींमुळे दोनशे कि.मी. रस्त्यांचा सत्यानाश

योजना अद्यापही अपूर्णच : सहा महिन्यांची आणखी प्रतीक्षा
योजना अद्यापही अपूर्णच : सहा महिन्यांची आणखी प्रतीक्षा
योजना अद्यापही अपूर्णच : सहा महिन्यांची आणखी प्रतीक्षा

जळगाव : शहरात तीन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटारांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आणखी सहा महिने हे काम पूर्ण होण्याला लागतील, असे सांगितले जाते. पाणीपुरवठा योजनेच्या कामाने संपूर्ण शहरातील रस्ते खड्ड्यात गेलेले असताना भुयारी गटारांच्या कामामुळे शहरातील दोनशेहून अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा अक्षरशः सत्यानाश झालांय.

तीन- साडेतीन वर्षांपूर्वी जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम मंजूर झाले, त्यासाठी भरीव निधीही प्राप्त होऊन काम सुरू झाले. पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्ते एका बाजूने खोदून ठेवल्यामुळे त्यांची दुरवस्था झालीय. सुमारे साडे सहाशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर जलवाहिनीचे काम झाल्याने हे रस्ते सध्या खड्ड्यात आहेत.

योजना अद्यापही अपूर्णच : सहा महिन्यांची आणखी प्रतीक्षा
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

भुयारी गटारींनीही सत्यानाश

दुसरीकडे भुयारी गटारांच्या कामामुळे दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा सत्यानाश झाला आहे. या योजनेच्या कामात २०४ किलोमीटर रस्त्यांवर विविध व्यासाच्या ड्रेनेजच्या वाहिन्या टाकून ठेवल्या आहेत. पाणीपुरवठ्याच्या कामामुळे रस्त्यांची जी अवस्था झाली, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक भुयारी गटार योजनेच्या कामांनी रस्ते खड्ड्यात घातले आहेत.

त्याला अशीही कारणे

भुयारी गटारांमुळे जे दोनशेहून अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले ते शंभर टक्के खराब झालेत. त्यामागे काही कारणे आहेत. एकतर भुयारी गटाराच्या कामासाठी ज्या पाइपलाइन टाकल्या गेल्या त्या क्षेत्र व तेथील वस्तीसंख्येनुसार वेगवेगळ्या व्यासाच्या आहेत. त्यासाठी काही रस्ते तीन फूट, काही त्यापेक्षा अधिक चारी करुन खोदावे लागलेत. त्यात ठरावीक अंतरावर चेंबरसाठी मोठा खड्डा करावा लागला, चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षा थोडे वर आहे. तर भुयारी गटाराच्या मुख्य वाहिनीला ठरावीक अंतरावरून आडव्या उपवाहिन्याही जोडण्यात आल्या आहेत. त्यासाठी रस्त्यांवर आडव्या चाऱ्या खोदण्यात आल्या. या कारणांमुळे हे दोनशे किलोमीटर लांबीचे रस्ते शंभर टक्के डॅमेज झालेत.

नवीन रस्तेच पर्याय

त्यामुळे भुयारी गटार योजनेचे काम ज्या रस्त्यांवर पूर्ण झाले त्यांची दुरुस्ती तांत्रिकदृष्ट्या होऊच शकत नाही .कारण, रस्ता पूर्ण खराब झाला आहे. परिणामी या दोनशे किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती न करता ते नवीन करणे हाच पर्याय शिल्लक आहे.

आणखी सहा महिने?

दुर्दैवाने हे काम अद्याप २० ते २५ टक्के अपूर्ण असल्याने ते केव्हा पूर्ण होईल, याबाबतही शंका व्यक्त होत आहे. आणखी सहा महिने तरी काम पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे. खरेतर या कामाची मुदत आधीच संपलेली आहे. मात्र आता तीन महिन्यांत काम पूर्ण होऊन त्याची चाचणी घेण्यात येईल, असा दावा मनपा प्रशासन करत आहे.

आणखी सहा महिने?

दुर्दैवाने हे काम अद्याप २० ते २५ टक्के अपूर्ण असल्याने ते केव्हा पूर्ण होईल, याबाबतही शंका व्यक्त होत आहे. आणखी सहा महिने तरी काम पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे. खरेतर या कामाची मुदत आधीच संपलेली आहे. मात्र आता तीन महिन्यांत काम पूर्ण होऊन त्याची चाचणी घेण्यात येईल, असा दावा मनपा प्रशासन करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com