बोरी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन

bori project
bori project

पारोळा (जळगाव) : यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गिरणा व बोरी धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असुन रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. यातील पहिले आवर्तन आज (ता. 19) सकाळी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात आले. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतशिवार हिरवाईने बहरण्यास मदत होणार आहे.


खरीप हंगामात कोरोनाचे गडद सावट असल्याने या वर्षी शेतकऱ्यांना उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी तीन आवर्तन तर पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन अशी चार आवर्तन सोडण्याच्या सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभुमीवर आज बोरी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

बोरी मध्यम प्रकल्प 
शेतकऱ्यांनी सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सिंचनाकरिता पाणी सोडल्यामुळे सर्व शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. कालवा सोडताना उपविभागीय अभियंता एम. आर. मीठ्ठे, शाखा अधिकारी पी. जे. काकडे, अजिंक्य पाटील, स्थापत्य सांख्यिक सहाय्यक व्ही. एम. पाटील आदी उपस्थित होते.

- डावा कालव्यातून लाभ मिळणारी गावे 
तामसवाडी, टोळी, शेवगे, पिंप्री, हिवरखेडे, मुंदाणे, सोके, मोंढाळे, करंजी. 

- उजव्या कालव्यातुन लाभ मिळणारी गावे
जोगलखेडा, उडणीदिगर, उडणी खालसा, मेहु, टेहु, कामतवाडी, वाघरे, पारोळा, विचखेडे, पुनगांव, शेवगे, महाळपुर. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com