जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !

पावसाळा सरासरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !

जळगाव : कृषी (farming) मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करण गरजेचे असून, केवळ पीक उत्पादनात वाढ महत्त्वाची नाही, तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधन (Agricultural Research) यांच्या माध्यमातून दर्जेदार पीक (Quality crop) उत्पादन करावे व आपला ब्रॅन्ड (Brand) निर्माण करावा. तसेच जळगाव जिल्ह्यात प्रादेशिक पिकांच्या (केळी (banana) , भरताची वांगी (Eggplant)आदी क्षेत्रात वाढ करावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केले. (pre-kharif meeting chief minister increase bananas and eggplant quality crop)

जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !
रुग्णवाहिकांना आता मोफत इंधन

खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली, त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे आदी सहभागी झाले होते.

शेतमालाला हमखास भाव मिळावा
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की या वर्षी पावसाळा सरासरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शेतकरी बांधव मात्र कशाचाही अंदाज न घेता अहोरात्र मेहनत करून शेतीत राबत असतो. त्याला कधी निसर्गाची साथ मिळते, कधी नाही. कधी खूप पीक येत, तर त्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभावापेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !
पोटच्या मुलांनीच सोडली साथ; कोरोनातून बरी झाल्‍यानंतर घरी नेण्यास नकार

महाराष्ट्र शेतीतील ब्रॅन्ड व्हावा
‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत मागणी आहे ते पिकवा आणि दर्जेदार उत्पादन घ्या या संकल्पनेच्या माध्यमातून काम केले जात आहे. महाराष्ट्र जे पिकेल ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असले पाहिजे, असे सांगतानाच विभागवार पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र हा शेतीतील ब्रॅन्ड झाला पाहिजे.

जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !
शासकिय यंत्रणेची दरवर्षीची पाहणी; तोडगा काढण्यास मात्र असमर्थ

रोटी थांबणार नाही
कोरोनाच्या कडक निर्बंधाच्या काळात एकवेळ रोजी मंदावेल, मात्र रोटी थांबणार नाही. ही रोटी देणाऱ्या शेतकऱ्याला बळ दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत आहे. मात्र शेतकऱ्याला नाही. त्याला शेतात राबावे लागते. त्याने केलेल्या कष्टाचे चीज करण्याचे काम राज्य शासन करत असून, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com