जिल्ह्यातील ही मोठी धरणं होताय फुल्‍लं; गावांना सतर्कतेचा इशारा 

hatnur dam
hatnur dam

जळगाव : जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी वाघूर धरण शंभर टक्के भरले असून, गिरणा धरण ९४ टक्के तर हतनूर धरण ७४ टक्के भरले आहे. यामुळे धरणातून पाणी सोडले जात आहे. परिणामी गिरणा, वाघूर, तापी नद्यांना पूर येण्याचा धोका असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात चांगला पाणीसाठा असल्याने आगामी रब्बी व उन्हाळी हंगामासाठीही पिकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. 

वाघूर धरण १०० टक्के भरले असून, त्यात पाण्याची आवक वाढल्यास धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाघूर नदीला यामुळे पूर आला आहे. त्यात हवामान खात्याने जिल्ह्यात मध्यम, जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव, भुसावळ, जामनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना दक्षता घेण्याविषयी सूचना देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिले आहे.

या संदर्भात भुसावळ व जळगाव प्रांताधिकारी, जळगाव, भुसावळ व जामनेर येथील तहसीलदारांना पत्र दिले आहे. गिरणा धरणाचे दरवाजे उघडल्यास गिरणा नदीला केव्हाही पूर येऊ शकेल, यामुळे गिरणा नदी काठावरील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com