व्यापाऱ्यांच्या ‘लॉबिंग’ने केळीचे भाव पाडले; शेतकरी संघटनेसह उत्पादकांचा आरोप

कोरोनाच्या काळात कोरोनाचे कारण सांगून कमी दराने केळी खरेदी केली गेली.
Farmers
Farmersesakal

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : केळीळा फलकावरील जाहीर झालेले भाव मिळून देखील केळी व्यापाऱ्यांकडून आपआसात लॉबिंग करून बाजारात केळी मालाला उठाव नसल्याचे कारण देत कमी भावात केळी खरेदी केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेसह केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. केळीचा भाव पाडून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत शुक्रवारी (ता. १२) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (Latest Marathi News)

कोरोनाच्या काळात कोरोनाचे कारण सांगून कमी दराने केळी खरेदी केली गेली. त्यावेळी शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी केलेला खर्चही मिळाला नाही व कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले. गेल्या काही दिवसांपासून बोर्ड भाव काही दिवस दिला. त्यात कुणी एका मोठ्या केळी व्यापाऱ्याने स्थानिक व्यापाऱ्यांना फोन करून भाव निम्म्यावर आणण्यास सांगितल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे आज केळीचा फलक भाव हा १९५० रूपये ते दोन हजार रूपये असा असताना स्थानिक व्यापारी हजार ते अकराशे रुपये या दराने शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करीत आहेत.

Farmers
आता झेंड्यांच्‍या व्‍यवहारातही घालमेल

वास्तविक केळी पीक तयार करण्यासाठी बारा ते चौदा महिने लागतात. लागवडीपासून काढणीपर्यंत बराच खर्च येतो. त्यातून चार दिवस रात्रीची वीज असताना तेवढ्या अंधाऱ्यात केळी पिकाला पाणी भरावे लागते. असे असताना सध्या मिळत असलेल्या दरात शेतकऱ्यांची मजुरी व खर्च निघणेही शक्य नसल्याने पीककर्ज व वीज बिले देण्याचीही परिस्थिती शेतकऱ्यांची राहिली नसून केळी उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन प्रचंड नैराश्येत सापडला आहे.

यामुळे या स्थितीत वेळीच हस्तक्षेप करून केळी पिकाबाबत गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या फलक भावानुसार केळीची खरेदी व्हावी, यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना भाग पाडावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी केळीचा भाव कमी करून कृत्रिम मंदी आणली त्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, तसेच जे स्थानिक केळी व्यापारी आपल्या दुकानात भाव फलक लिहिणार नाहीत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. पाटील यांच्यासह निवेदनावर शेतकरी गोरख पाटील, नाना कच्छवा, भिमसिंग खंडाळे, योगेश पवार, सुमेरसिंग राजपूत, रुपसिंग पवार, किरण चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Farmers
चार गावातून एकाच रात्री 12 गुरे चोरीला; शेतकरी भयभीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com