रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' ची आळवणी करत मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुर्हूतावर गणेशाला जिल्हावासियांनी निरोप दिला. जिल्ह्यात मंगळवारी 11 दिवसांच्या जिल्ह्यातील 36 हजार 700 घरगुती तर 48 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन पार पडले. कोरोनामुळे ना मिरवणूक, ना ढोल - ताशांचा गजर, मात्र गणेश भक्तांचा उत्साह अवर्णनीय होता.
जिल्ह्यात सुमारे 1 लाख 66 हजार 660 गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे गणेश विसर्जन सोहळे अगदी साधेपणाने मात्र भक्तीमय वातावरणात पार पडले. ज्यापमाणे अकरा दिवसांसाठी घरी आलेल्या बाप्पाचे स्वागत उत्साही वातावरणात झाले, त्याच उत्साहात हळव्या अंत:करणाने गणेशभक्तांनी मंगळवारी बाप्पाला निरोप दिला. या विसर्जन सोहोळयावेळी देखील कुठेही जल्लोष नव्हता.
अगदी साधेपणाने केवळ 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घालत आणि जगावर ओढवलेले कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालत विसर्जन पार पडले. दुपारपासूनच गणरायाचे विसर्जन सुरू झालेले होते. यावेळेस दरवर्षीपमाणे होणारी गर्दी टाळून सोशल डिस्टन्सचे भान राखत रत्नागिरीत मांडवी चौपाटी, भाट्ये, पांढरासमुद्र, किल्ला, मिऱ्या येथ विसर्जन करण्यात आले. शहरात न.प.ने कृत्रिम तलावांची व्यवस्था केल्याने भाविकांकडून गणपतींचे विसर्जन केले जात होते.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.