

victory procession
sakal
रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुयोग कांबळे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान पराभूत अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांच्या घरासमोर फटाके आणि नारळ फोडण्यावरून आणि घराच्या बांधाचे नुकसान झाल्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले.