पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे मुंगनेकरवाडी परिसरातील दोघांच्या आंबा कलम बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने अनेक आंबा-काजू कलमे आगीत होरपळली असून दोन-तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
नाखरे गावातील कृष्ण वसंत महाडिक यांची २२ हापूस कलमे व नारायण बाबू मुंग नेकर यांची पंधरा हापूस कलमे व १५ काजू कलमे आगामुळे खाक झाली. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बागेच्या जवळून जाणाऱ्या विद्युत कंपनीच्या लाईनमध्ये सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विद्युततारांचे घर्षण झाल्याने बागेमध्ये असलेल्या गवताने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतली आणि या परिसरातील दोघांच्या बागेत आगीने प्रवेश केला.
हेही वाचा - बिबट्याची झलक कॅमेऱ्यात कैद
या परिसरातील ग्रामस्थांनी नळपाणी योजना खासगी विहिरी यांच्या पाण्याच्या माध्यमातून करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही बागेतील असलेली आग आटोक्यात आली. यात दोन्ही बागायतदारांचे सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले. हापूस आंब्याला पोषक वातावरण असताना आणि हंगाम चांगला जाण्याचे संकेत असतानाच बागेला आग लागल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.