

Political unrest intensifies in Ratnagiri ahead of ZP elections.
sakal
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. हातखंबा, गोळप आणि खालगाव गटांमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीने आता थेट बंडखोरी, पक्षातून हकालपट्टी आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांपर्यंत मजल मारली असून, या घडामोडींमुळे सत्ताधारी शिवसेनेसह महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.