
-अमित गवळे
पाली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. 18 वर्षे उलटूनही या महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. यंदा पुन्हा गणरायाच्या आगमनात खड्डे व खराब रस्त्याचे विघ्न कोकणकर व प्रवाशांवर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर असंख्य नागरिक आपला संताप व भावानांचा निचरा व्यक्त करतांना दिसत आहेत.