

Evironmental Activists
sakal
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीनंतर आता पुनर्लागवडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यावरणप्रेमींनी या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. जलदुत व पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह यांनी संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत १ मेपासून खड्डा दफन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात रस्त्याच्या कडेला असलेली शेकडो वर्षांपूर्वीची मोठमोठी देशी वृक्ष तोडण्यात आले.