Sawantwadi News : मोती तलावात मृत माशांचा मोठा खच; काय आहे कारण? प्रशासनावर ओढवली नामुष्की

सावंतवाडी शहरातील मोती तलावात (Moti Talav) मासे मृत होण्याचे प्रमाण थांबता थांबेना झाले आहे.
Fish Moti Talav
Fish Moti Talavesakal
Summary

शहरातील काही व्यावसायिकांकडून सांडपाणी व तेलयुक्त दूषित पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात (Moti Talav) मासे मृत होण्याचे प्रमाण थांबता थांबेना झाले आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने मासे (Fish) मृत होत असल्याने यामागचे नेमके कारण काय?, हे शोधण्यासाठी अखेर तलावातील पाणी चाचणीसाठी संशोधन केंद्रांत (Research Centre) पाठविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

शहरातील मोती तलावात मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडले जाते. तलावात वाढलेल्या माशांच्या विक्रीतून पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी भर पडते. ठेकेदार नेमून नियमानुसार ही प्रक्रिया पालिका प्रशासनाकडून राबविण्यात येते; मात्र गेले काही दिवस तलावातील मासे मृत होण्याची संख्या वाढली आहे. मुळात तलावातील पाणी हिरवट रंगाचे झाले असून, पाण्यावर तवंग पसरला आहे.

शेवाळ पद्धतीचा हा प्रकार असून, यामुळेच मासे मृत होत असल्याचा कयास काहींचा आहे. शहरातील काही व्यावसायिकांकडून सांडपाणी व तेलयुक्त दूषित पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरू असताना प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. एकूणच यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता टाळता येत नसल्याचा आरोप काही जागृत नागरिकांनी केला आहे.

Fish Moti Talav
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

मोती तलावातील पाणी दूषित होत असल्याचा प्रकार गतवर्षी ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव यांनी पालिका प्रशासनाला उघडकीस आणून दिला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने तलावात बोटींग करून यावर काहीशी मात केली होती. तलावातील पाणी स्थिर असल्याने बऱ्याचदा तवंग निर्माण होतो, असे जाणकारांचे मत आहे. सद्यस्थिती पाहता प्रचंड प्रमाणात पाण्यावर हिरवट तवंग आहे.

मृत मासेही दिवसेंदिवस बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे; मात्र मृत माशांमुळे तलावाच्या काठी दुर्गंधी पसरली असून, सकाळच्या प्रहरी तलावाकाठी फिरणाऱ्यांना नाकावर हात ठेवण्याची वेळ आली आहे. सायंकाळीही हाच प्रकार नागरिकांना सतावत असून, प्रशासनाने यावर तत्काळ उपाय शोधावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जलपर्णी काढण्याचे काम

सावंतवाडी शहरात गेले कित्येक दिवस जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हॉस्पिटल समोरील तलावातील जलपर्णी काढून झाल्यानंतर आता सारस्वत बँकेसमोरील तलावात हे काम सुरू आहे. यामुळेही पाणी दूषित होऊन मासे मृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काहींचे म्हणणे आहे.

Fish Moti Talav
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंना लाथाडणाऱ्या गद्दारांचा विधानसभा निवडणुकीत शेवट करणार; खासदार राऊतांचा घणाघात

मागच्या वर्षापासून मोती तलावामध्ये मासे मृत होत आहेत. यंदा हे प्रमाण बरेच वाढले आहे. तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होऊन माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याने हे मासे मृत होत आहेत. पालिका प्रशासनाने सांडपाण्याबाबत वेळीच निर्णय घ्यावा. तलावातील पाणी हालते राहण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा बसवावी.

- रवी जाधव, खजिनदार, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान

मासे मृत होण्याचे नेमके कारण पुढे आले नाही; मात्र याचे वाढते प्रमाण लक्षात घेता तलावातील पाणी चाचणीसाठी मुळदे संशोधन केंद्रात पाठविले आहे. त्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे. दुर्गंधीबाबत प्रशासनाकडून पावले उचलण्यात येणार आहेत.

- सागर साळुंखे, मुख्याधिकारी, सावंतवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com