Vinayak Raut vs Eknath Shinde
Vinayak Raut vs Eknath Shindeesakal

उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला, तेव्हा मद्यपान करून गद्दारांची औलाद..; काय म्हणाले राऊत?

राजन साळवींनी ५० खोके घेतले नाही, म्हणून त्यांच्या मागे एसीबीची कारवाई लागली.
Summary

'बारसू रिफायनरी ही दलालांसाठी आणण्याचा घाट घातला जात आहे. या दलालांना ही रिफायनरी हवी आहे.'

रत्नागिरी : भाजपचे प्रमोद जठार (Pramod Jathar) यांना पक्षीय काविळ झाल्यामुळे ते बोलत आहेत. परंतु एवढा मोठा पक्ष असताना त्यांना अजून उमेदवार मिळत नाही, यातच भाजपचे अडचणीत असल्याचे दिसते. तिन तिघाड आणि काम बिघाड, अशी ही महायुती आहे. भाजपच्या (BJP) पहिल्या यादीत नितीन गडकरीसारख्या मोठ्या नेत्याचे नाव येत नाही, यावरूनच भाजपचे अपयश लक्षात येते, असा टोला शिवसेनेचे (उबाठा) उपनेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपला हाणला.

Vinayak Raut vs Eknath Shinde
Ramdas Kadam : 'गीतेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी 2009 च्या निवडणुकीत मला पाडलं'

राऊत म्हणाले, खासदार म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी संसदेत पाच वर्षांमध्ये शब्द काढला की नाही, हे क्युआर कोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू, ब्रिगेडीअर सावंत आदींचा आदर्श घेऊन काम करत आहे. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे हे एक मोठे शस्त्र आहे.

परंतु मी गेल्या पाच वर्षांमध्ये एकही रुपयाचा रोजगार आणला नाही, असे अपयशी खासदार म्हणणाऱ्या भाजपच्या प्रमोद जठार यांना सडेतोड उत्तर दिले. राज्यात आज महविकास आघाडी भक्कम होत चालली आहे. तिन्ही पक्षांच्या मतांची गोळ बेरीज केली तर रत्नागिरी आणि रायगड लोकसभेत आम्हाला नक्की यश मिळणार हे निश्चित आहे.

Vinayak Raut vs Eknath Shinde
विषयचं हार्ड! 'त्या' काळात कोल्हापुरात व्हायच्या उंटांच्याही झुंजी, संशोधनातून माहिती समोर; कबुतरांसह बैल, म्हशींचा नाद मात्र कायम

शिवसेनेत फुट पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला, तेव्हा मद्यपान करून टेबलवर उभे राहून नाचणारी ही गद्दारांची औलाद आहे. राजन साळवींनी ५० खोके घेतले नाही, म्हणून त्यांच्या मागे एसीबीची कारवाई लागली. परंतु तरी हा सच्चा शिवसैनिक डगमगला नाही. मला साळवींचा अभिमान आहे.

Vinayak Raut vs Eknath Shinde
Water Crisis : रत्नागिरीत 'इतके' दिवस पाणी कपात; शिल्लक साठा पुरवण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

प्रदूषणकारी रिफायनरी कशाला हवी

बारसू रिफायनरी ही दलालांसाठी आणण्याचा घाट घातला जात आहे. या दलालांना ही रिफायनरी हवी आहे. परंतु लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांवर अजून उपाय नाहीत. पिढीच्या पिढी नष्ट होत आहे. त्यात ही प्रदुषणकारी रिफायनरी कशाला हवी आहे०असा प्रश्नही विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com