Yogesh Kadam latest remarks on Uddhav Thackeray
esakal
रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. २०१४ मध्ये आवश्यक संख्याबळ कमी पडल्याने त्यांना संधी मिळाली नाही. जर त्यावेळी आकडे जुळून आले असते तर कदाचित तेव्हाच त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता. पहिल्यापासूनच मी मुख्यमंत्री कसा होईन, अशीच उद्धव ठाकरे यांची मानसिकता (Uddhav Thackeray 2014 Maharashtra political decision) होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले असावेत, असा संशय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.