राजापूर : विश्रामगृहातून उत्पन्नवाढ नाहीच, तोटा अधिक

राजापूर पालिकेचे विश्रामगृह शोभेचे बाहुले
तोटा अधिक
तोटा अधिकsakal

राजापूर : उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून उपलब्ध झालेल्या अनुदानातून बांधलेले येथील नगरपालिकेचे विश्रामगृह गेल्या काही वर्षांपासून बंदस्थितीमध्ये आहे. शहराच्या प्रवेशद्वाराच्या येथे बंदस्थितीत असलेली ही इमारत सध्या शोभेची बाहुली ठरली आहे. ‘क’ वर्गातील नगरपालिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत फारसे नसून ते मर्यादित असल्याने पालिकेचे उत्पन्नही त्या तुलनेत मर्यादित असते.

कमी उत्पन्नामुळे सहाजिकच शहराच्या विकासावर काही मर्यादा पडत असल्याचे चित्र दिसते. अशा पालिकांच्या उत्पन्नामध्ये एकप्रकारे वाढ होण्यासाठी हातभार लागावा, या उद्देशाने शासनाने शंभर टक्के अनुदानातून ‘क’ वर्गातील पालिकांना अनुदान दिले होते. यामधून येथील पालिकेला शासनाकडून १६ लाख अनुदान मंजूर झाले होते. त्या अनुदानातून मुंबई-गोवा महामार्गावरील जकात नाकानजीक शहराच्या प्रवेशद्वाराच्या येथे पालिकेने आपल्या जागेमध्ये तीन खोल्यांसह हॉटेलची सोय असणारी विश्रामगृहाची १९९९ मध्ये इमारत बांधली आहे. शासनाच्या अनुदानातून बांधण्यात आलेले हे विश्रामगृह ४० हजार रुपये अनामत रक्कम घेऊन प्रतिमहा ४ हजार १०० रुपये भाड्याने देण्याचा निर्णय त्यावेळी कौन्सिलने घेतला होता.

ठेकेदारांच्या या ‘नकार घंटे’मुळे...

दरम्यान, कौन्सिल या निर्णयाची अंमलबजावणी होताना हे विश्रामगृह चालविण्यासाठी ठेकेदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ठेकेदारांच्या या ‘नकार घंटे’मुळे सद्यस्थितीमध्ये ही इमारत बंदस्थितीत आहे. इमारत बंदस्थितीत असल्याने त्या इमारतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा पालिकेचा मूळ उद्देश सफल होण्याऐवजी उलटपक्षी तोटाच झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com