India vs Pakistan Final Match Regulations
esakal
Asia Cup Final 2025 Reserve Day Rules Explained : आशिया कपचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या आशिया कपबाबत बोलायचे झाल्यास, साखळी फेरी आणि सुपर 4 या दोन्ही टप्प्यांतील सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आज तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत करण्याची संधी भारतीय संघाला आहे, आणि त्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.