Suryakumar Yadav
esakal
Why did India avoid handshake Asia Cup 2025 : क्रिकेट आणि खिलाडूवृत्ती सर्व काही ठीक आहे, पण कधी कधी काही गोष्टी त्याही पलीकडच्या आणि भावनिक असतात, असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले. आशिया कप २०२५ मधला रविवारचा भारत वि पाकिस्तान सामना सर्वार्थाने वेगळा झाला. नेहमीची गोष्ट एकच होती ती म्हणजे भारतीय संघांचे निर्विवाद वर्चस्व. नाणेफेकीअगोदर दोन्ही कप्तान एकमेकांना आपापल्या संघातील खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी देतात. रविवारच्या सामन्यात यादी कप्तानांनी थेट सामना अधिकाऱ्यांना दिली गेली, तेथूनच भारतीयांनी पाकला बेदखल करण्यास सुरुवात केली होती.