
Asia Cup Final Drama: India Declines Trophy – Rules Explained
Esakal
Asia Cup Final Drama: भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ गडी राखून नमवलं. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली. दरम्यान, स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. या ऐतिहासिक विजयानंतरही भारतीय संघाला ट्रॉफिशिवाय आनंद साजरा करावा लागला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला. आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पीसीबीचे प्रमुख आणि पाकिस्तानमध्ये मंत्रीही आहेत. भारताने त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन निघून गेले.