

India vs Pakistan T20 World Cup Clash: AI Predicts Winner as Abhishek Sharma Takes Center Stage
esakal
कोलंबो येथील आर. प्रेमदासा मैदानावर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषक सामना रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज लढतीमुळे दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत आठ सामन्यांचा सामना झाला असून, त्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आहे. भारताने सात विजय मिळवले आहेत, तर पाकिस्तानला केवळ २०२१ मध्ये एकच यश मिळाले. या मैदानावर २००९ पासून भारताने १५ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात ११ विजय आणि केवळ चार पराभव आहेत. हे आकडे भारताच्या बाजूने मजबूत आधार देतात.