IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Asia Cup 2025 India vs Pakistan handshake controversy : आशिया चषक २०२५मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर वाद अधिक चिघळला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. या घटनेवर पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.
Suryakumar Yadav, Salman Ali Agha | IND vs PAK | Asia Cup 2025

Suryakumar Yadav, Salman Ali Agha | IND vs PAK | Asia Cup 2025

Sakal

Updated on
Summary
  • भारताने आशिया चषक २०२५ सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आणि सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के केले.

  • भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन टाळले, सूर्यकुमार यादवने विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित केला.

  • पाकिस्तानच्या माजी कर्णधार राशिद लतीफने भारतीय संघाच्या वागणुकीवर वादग्रस्त विधान केले.

Rashid Latif’s Explosive Remark Amid Asia Cup Tensions : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील लढतीत पाकिस्तानी खेळाडूंनी न केलेले हस्तांदोलन शेजाऱ्यांच्या जरा खूपच जिव्हारी लागलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर IND vs PAK यांच्यातला हा पहिलाच क्रिकेट सामना होता आणि त्यामुळे या सामन्याबाबत अनेक मतमतांतरं होती. पण, सरकारच्या निर्णयानुसार भारतीय संघ हा सामना खेळला, परंतु त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ हस्तांदोलनासाठी मैदानावर वाट पाहत असताना भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com