Why IND vs PAK Asia Cup 2025 tickets not sold out
esakal
आशिया कप 2025 मधील भारत–पाक सामना तिकीट विक्रीत अपयशी ठरत आहे.
दुबई स्टेडियमचे अर्ध्याहून अधिक तिकीट रिकामी असून अपेक्षित प्रतिसाद नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय प्रेक्षकांत पाकिस्तानविरुद्ध नाराजी आहे.
Low Ticket Sales for India vs Pakistan Clash in Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना दोन दिवसांवर आला आहे आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निम्मी तिकीटही विकली गेलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट काय कोणतेच संबंध ठेवता कामा नये, अशी भारतीयांची भावना आहे. पण, यावर केंद्र सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करताना बहुदेशीय स्पर्धेत Ind vs Pak सामन्याला विरोध करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे १४ सप्टेंबरला हा सामना होतोय, परंतु या सामन्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या इतिहासात प्रथमच रिकाम्या खुर्च्यांसमोर लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.