India Crush UAE in Record-Breaking T20I
esakal
भारताने UAE वर ९ विकेट्सने आणि ९३ चेंडू राखून सर्वात मोठा T20I विजय मिळवला.
UAE संघ फक्त ५७ धावांत गडगडला, ही त्यांची T20I मधील निचांक खेळी ठरली.
कुलदीप यादवने ४-७ अशी गोलंदाजी करून आशिया कपातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी केली.
India Registers Biggest T20I Win, Ends Toss-Loss Streak : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत दणदणीत विजयाने सुरुवात केली. दुबळ्या संयुक्त अरब अमिरातीवर ९ विकेट्स व ९३ चेंडूंत विजय मिळवून अ गटातील गुणखाते उघडले. कुलदीप यादव ( ४-७) व शिवम दुबे ( ३-४) यांच्या भेदक माऱ्यासमोर यूएईचा संघ ५७ धावांवर गडगडला आणि भारताने ४.३ षटकांत मॅच जिंकली. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या टीमने ८ मोठ्या विक्रमाची नोंद केली.