IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

Pakistan media reaction after India defeat : आशिया चषक २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानच्या पत्रकाराने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर नाहक आरोप केले आहेत. भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पराभव करून सुपर ४ मध्ये प्रवेश केला.
Pakistani journalist sparks controversy by calling Suryakumar Yadav BJP spokesperson

Pakistani journalist sparks controversy by calling Suryakumar Yadav BJP spokesperson

esakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत सुपर ४ मध्ये प्रवेश केला.

  • नाणेफेकनंतर सूर्यकुमारने पाक कर्णधार सलमान अली आगाला हात न मिळवता थेट निघून गेला.

  • सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळत थेट ड्रेसिंग रुममध्ये परतले, ज्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला.

Suryakumar Yadav called BJP spokesperson by Pakistani journalist : भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक स्पर्धेचा सामना संपला... भारताने ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून सुपर ४ मधील आपली जागा पक्की केली.. पण, या सामन्यात टीम इंडियाने काढलेली इभ्रत पाकिस्तानच्या जिव्हारी लागलीय... त्यामुळे माजी खेळाडूंसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष संतापले आणि त्यांनी आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. आता पाकिस्तानी पत्रकारही सैरभैर झाले आहेत आणि काहीही बरळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com