
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सध्या तणावाचे वातावरण आहे.एप्रिलमध्ये जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने ऑपरेश सिंदूर मार्फत दिले. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले झाले. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालाही बसला.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) एका आठवड्यासाठी स्थगित झाली, तर पाकिस्तान सुपर लीग (PSL) देखील स्थगित झाली. पाकिस्तान सुपर लीग युएईमध्ये हलवण्याचाही विचार होता. मात्र, त्यांना यासाठी नकार मिळाला. अखेर ही स्पर्धाही स्थगित करण्यात आली.