
शुभमन गिलच्या कसोटी कर्णधारपदाचा कार्यकाळ भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेपासून सुरू झाला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारला.
मात्र दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करत ३३६ धावांनी मोठा विजय मिळवल. हा परदेशातील धावांच्या तुलनेतील भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला, तसेच ऍजबॅस्टनमध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला.
हा विजय मिळवून देण्यात गिलने मोलाचा वाटा उचलला. त्याने पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली होती.