
भारत आणि इंग्लंड संघात बर्मिंगहॅमला कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाचव्या दिवशी ३३६ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने हा विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.