Hardik Pandya retains MI captaincy as management shows faith
esakal
Hardik Pandya captaincy Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. १० पैकी ३ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे आणि प्ले ऑफचे आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. असे असले तरी संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची घाई करणार नाही. पाचवेळच्या विजेत्या संघाने २०२४ मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिककडे सोपवले होते. तेव्हा प्रचंड टीका झाली होती. MI चा कर्णधार म्हणून हार्दिकला आयपीएलच्या मागील तीन पर्वात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी संघ व्यवस्थापन हार्दिकच्या पाठीशी उभे आहे.