IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

IND vs ENG 4th T20I Marathi Cricket News: इंग्लंडविरुद्धच्या करो वा मरोच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे तिघेही स्वस्तात बाद झाल्याने भारतीय डावाची सुरुवातच डळमळीत झाली.
Shreyas Iyer  crucial half-century

Shreyas Iyer crucial half-century

esakal

Updated on

England vs India, 4th T20I Marathi Cricket Update : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. मालिकेतील आव्हान टीकवण्यासाठी आवश्यक असलेल्या सामन्यातही हे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला दिलेल्या धक्क्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यराने भारताला सावरले. त्याला शिवम दुबेची काही काळ साथ मिळाली, परंतु श्रेयसने अखेरपर्यंत खिंड लढवली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सन्मानजनक धावसंख्या उभी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com