IND vs PAK : टीम इंडियाचा पवित्रा अन् शोएब अख्तरची रडारड! म्हणाला, तुम्ही राजकारण आणताय, आम्ही बरंच काही बोलू शकतो, पण...

Shoaib Akhtar reacts to India's no handshake stance : आशिया चषक २०२५ मधल्या भारत–पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यामुळे नवा वाद पेटला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने यावर जोरदार प्रतिक्रिया दिली.
Shoaib Akhtar accuses India of mixing politics with cricket

Shoaib Akhtar accuses India of mixing politics with cricket

esakal

Updated on
Summary
  • आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

  • भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता जगाला दहशतवादाविरुद्ध संदेश दिला.

  • शोएब अख्तरने यावर नाराजी व्यक्त करत भारत राजकारण आणतोय अशी टीका केली.

Shoaib Akhtar accuses India of mixing politics with cricket IND vs PAK : टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं, यापेक्षा त्यांच्याशी हात न मिळवल्याचं दुःख शेजाऱ्यांना जास्त झाल्याचे दिसतेय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत रविवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. सूर्याने सामन्यानंतर पहलगाम हल्ल्यातील शहिदांना हा विजय समर्पीत केला. भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करून, जगाला एक मोठा संदेश दिला की दहशतवादाला थारा देणाऱ्यांसोबत असंच वागायला हवं. टीम इंडियाच्या या पवित्र्यानंतर पाकिस्तानींना मिरची झोंबणे साहजिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com