

India A vs Sri Lanka A
Sakal
तिलक वर्माच्या नेतृत्वातील भारतीय अ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेत भारताची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. सोमवारी भारतीय संघाला श्रीलंका अ संघाविरुद्ध रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हा भारताचा मालिकेतील सलग दुसरा पराभव आहे. या आधी भारताला अफगाणिस्तान अ संघाकडूनही पराभवाचा सामना करावा लागला होता.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २६५ धावा करत श्रीलंकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण श्रीलंका संघही ५० षटकात ९ विकेट्स गमावत २६५ धावाच करू शकले, त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली. त्यानंतर सुपर ओव्हर झाली. पण त्यात श्रीलंकेने दिलेल्या १७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १० धावाच करता आल्या.