
भारतीय क्रिकेट संघाला बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील दुसरा सामना खेळायचा आहे. पहिल्या कसोटी सामन्यात हेडिंग्लेमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला होता. पण या सामन्यानंतर साधारण आठवडाभराने दुसरा सामना होत आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करून आता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज आहे.
मात्र या कसोटी सामन्यापूर्वी सर्वात मोठा प्रश्न आहे तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही. कारण यापूर्वीच भारतीय संघव्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ३१ वर्षीय बुमराह ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीनच सामने खेळणार आहे.