

Suryakumar yadav - Hardik Pandya
Sakal
अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने शनिवारी (६ जून) इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघाची घोषणा केली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंडमध्ये २ टी२० सामने भारताला खेळायचे आहेत, तर इंग्लंडमध्ये १ जुलैपासून पाच टी२० सामने भारतीय संघ खेळेल. याशिवाय सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघांची घोषणा करताना निवड समितीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वात मोठा निर्णय म्हणजे भारताचा टी२० कर्णधार बदलण्यात आला आहे.