

Sanju Samson | T20 World Cup 2026
Sakal
भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. हा सुपर - ८ मधील सामना असल्याने भारताला हा पराभव महागात पडू शकतो.
आता सुपर-८ मधील उर्वरित दोन्ही सामने भारतासाठी 'करो वा मरो' असेच आहेत. त्यातच भारतीय संघाला (Team India) स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांच्या फॉर्मचीही चिंता सतावत आहे. याशिवाय रिंकू सिंगही फार काही खास करू शकलेला नाही.