Abhishek Sharma may sit out while Rinku Singh strengthens the middle order
esakal
Team India tactical changes for T20 World Cup knockout: भारतीय संघाने सुपर ८च्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जागा पक्की केली. करो वा मरो सामन्यात संजू सॅमसनने ९७ धावांची नाबाद खेळी करताना भारताला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. आता भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करायचा आहे. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्च रोजी होणार आहे. भारतीय संघाने इथपर्यंत मजल मारली असली तरी आघाडीच्या फळीत सातत्य नसणे, ही डोकेदुखी ठरणारी बाब आहे.