

MS Dhoni
Sakal
MS Dhoni Captaincy Resignation Inside Story: भारताच्या दिग्गज कर्णधारांमध्ये एमएस धोनीचे नाव घेतले जाते. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक देखील आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफीही जिंकल्या आहेत. पण त्याने २०१६ च्या अखेरीस अचानक भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
तथापि, धोनीने (MS Dhoni) २०१४ च्या अखेरीसच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो त्यानंतरही वनडे आणि टी२०मध्ये सक्रिय होता आणि भारतीय संघाचे नेतृत्वही करत होता. मात्र असं असतानेच अचानक त्याने कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर विराट कोहलीला (Virat Kohli) भारताचा वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार (Captain) करण्यात आले.
हा नेतृत्वबदल अत्यंत सहजपणे झाला होता. धोनी नंतर २०१९ पर्यंत विराटच्या नेतृत्वातही खेळला. पण आता तब्बल ९ वर्षांनी तत्कालिन निवड समिती सदस्य जतीन परांजपे (Jatin Paranjape) यांनी धोनीने कर्णधारपद कशाप्रकारे सोडलं, याबाबत मोठा खुलासा केला आहे.