
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्व संघांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. जवळपास सर्व खेळाडूही आपापल्या संघात दाखल झाले आहेत. मात्र, असे असतानाच लखनौ सुपर जायंट्सला मात्र मोठी चिंता आहे. अद्याप संघात कोणते गोलंदाज खेळणार आहे, हेच निश्चित नाही. कारण संघातील अनेक गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत.
लखनौने संघात रिटेन केलेला मयंक यादव, मोहसीन खानसह लिलावातून घेतलेले आकाश दीप, आवेश खान, या चौघांच्याही तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहे.