

MS Dhoni, Rohit Sharma Reaction to T20 WC 2026 Win
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं. यासोबतच सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तीन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा पहिला संघ ठरला.
इतकेच नाही, तर मायदेशात टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणाराही भारत पहिला संघ आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या भारतीय संघाने (Team India) अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हे ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं आहे.