Pahalgam Attack : ८ लाखांची फौज, तरी काश्मीरमध्ये हे घडलं? शाहिद आफ्रिदीने मर्यादा ओलांडली, भारतीय सैन्याला बेकार ठरवलं

Shahid Afridi on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. यात २६ जणांनी प्राण गमावले. या हल्ल्याबद्दल देश विदेशातून प्रतिक्रिया उमटत आहे. यातच आता शाहिद आफ्रिदीने भारताच्या सैन्यालाच दोष दिला आहे.
Shahid Afridi on Pahalgam Terror Attack
Shahid Afridi on Pahalgam Terror AttackSakal
Updated on

पाच दिवसांपूर्वी २२ एप्रिलला संपूर्ण भारताला हादवणारी घटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडली. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यात २६ जणांची आपले प्राण गमावले. यातील सर्वाधिक नागरिक हे पर्यटक होते. तिथे फिरायला आलेल्या पर्यटकांनाच दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं.

या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. ही संघटना पाकिस्तानमधील लष्कर-ए-तायबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे. त्यानंतर भारतातून पाकिस्तानबद्दल संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या.

Shahid Afridi on Pahalgam Terror Attack
Pahalgam Attack: पाकिस्तानवर आरोप करता, पुरावा काय? Shahid Afridi चं डोकं फिरलंय, भारतालाच उलट प्रश्न
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com