

जून २०२४ मध्ये गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्याच्या अंतर्गत सपोर्ट्स स्टाफच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी वर-खाली राहिली. त्यातही गेल्या दोन कसोटी मालिकेत भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना भारतीय संघात वाद असल्याच्या चर्चाही कानावर आल्या. ड्रेसिंग रुममध्ये गंभीरचा राग अनावर झाल्याचेही समोर आले होते. यानंतर गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही सुरळीत आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण आता यावर रोहित शर्मानेच स्पष्टीकरण दिले आहे.