Team India: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Sanjay Manjrekar Backs Gautam Gambhir, Shreyas Iyer: भारतीय टी२० संघाला आयर्लंडपाठोपाठ इंग्लंड दौऱ्यातही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांना काढून टाकण्याची मागणी होत आहे. यावर संजय मांजरेकर यांनी मोठे भाष्य केले आहे.
Gautam Gambhir - Shreyas Iyer

Sanjay Manjrekar reacting to Team India performance and criticising BCCI after the England series

Sakal

Updated on

Sanjay Manjrekar’s Strong Message to BCCI: भारतीय टी२० संघाने मार्च २०२६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. पण त्यानंतर बराच बदल टी२० संघात झाला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आणि उपकर्णधार म्हणून तिलक वर्माला (Tilak Varma) नेमण्यात आले. मात्र या नव्या नेतृत्वाखाली भारतीय टी२० संघाची सुरुवात निराशाजनक राहिली.

जूनच्या अखेरच भारतीय संघाला आयर्लंडकडून २-० असा पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये ४-० असा पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सध्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकावे अशी मागणीही होत आहे.

मात्र माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी याउलट सल्ला दिला असून त्यांनी म्हटलं आहे की समस्या खूप खोलवर रुजलेली आहे.

Gautam Gambhir - Shreyas Iyer
IND vs ENG ODI: रोहित-विराटच्या पुनरागमनाने टीम इंडियाच्या अपेक्षा वाढल्या; इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत बदलणार चित्र?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com