Shahid Afridi angry statement on Pakistan U-Turn India match
esakal
Pakistan U-Turn controversy Shahid Afridi statement: पाकिस्तान सरकारने अखेर आपलाच निर्णय बदलला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्ध खेळण्यास सांगितले. बांगलादेश क्रिकेट संघाची मागणी फेटाळून त्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) संतापले होते. बांगलादेश आमचा भाऊ आहे म्हणत पीसीबीने सुरुवातीला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली होती. त्यानंतर त्यांनी India vs Pakistan सामन्यावर बहिष्कार टाकल्याचे सरकारकडून जाहीर करून घेतले. पण, ही भूमिका आपल्याला परवडणार नसल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी बहिष्कार मागे घेतला. आता यावरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याला संताप अनावर झाला आहे.