

Shreyas Iyer on Leading Team India in T20Is
Sakal
बीसीसीआयने शनिवारी (६ जून) भारताच्या टी२० संघाचे नेतृत्वबदल जाहीर केले. भारतीय टी२० संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे. त्यानंतर १ जुलैपासून इंग्लंडमध्ये टी२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतही सामने खेळायचे आहेत. त्यासाठी शनिवारी निवड समितीने संघाचीही घोषणा केली.
यावेळी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) भारताच्या टी२० संघाचा कर्णधार (India's T20I Captain) करण्यात आले, तसेच तिलक वर्माला उपकर्णधार करण्यात आले. मात्र, हे बदल करताना सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) टी२० कर्णधारपद काढून घेण्यासोबतच त्याला संघातूनही वगळण्यात आले आहे.