Shreyas Iyer reaction after India defeat
esakal
Shreyas Iyer reaction after India defeat vs ENG 3rd T20I: भारतीय संघाला ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवताना भारताचा संपूर्ण संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला, यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८० धावांनी हार झाली होती. भारताची ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील दुसरी निचांक धावसंख्या ठरली. २००८ मध्ये भारत मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांत तंबूत परतला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला.