IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

India's biggest defeat by runs in T20I: इंग्लंडकडून १२५ धावांनी झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला.
Shreyas Iyer reaction after India defeat

Shreyas Iyer reaction after India defeat

esakal

Updated on

Shreyas Iyer reaction after India defeat vs ENG 3rd T20I: भारतीय संघाला ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवताना भारताचा संपूर्ण संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला, यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८० धावांनी हार झाली होती. भारताची ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील दुसरी निचांक धावसंख्या ठरली. २००८ मध्ये भारत मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांत तंबूत परतला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com