Gautam Gambhir reiterates his stand against India playing Pakistan in World Cups
esakal
Gautam Gambhir wants India to boycott Pakistan: पाकिस्तानने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर त्यांचा हा निर्णय जाहीर केला. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या सर्व लढती श्रीलंकेत होणार आहे, कारण भारतात खेळण्यास त्यांचा विरोध आहे. त्यामुळे ते फायनलला पोहोचल्यास तो सामना श्रीलंकेतच होईल. १५ फेब्रुवारीला होणाऱ्या India vs Pakistan सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला असला तरी भारत श्रीलंकेत जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार सूर्यकुमार यादवची टीम मैदानावर टॉससाठी जाईल आणि पाकिस्तान न आल्यास भारताला दोन गुण मिळतील.