
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरे यांनी अर्धशतके केली. दरम्यान, स्मिथला त्याच्या खेळीच्या सुरुवातीलाच जीवदान मिळाले होते, ज्याचा फायदा त्याने घेतला.