
मंगळवारी भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभूत केले आणि सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना गाठला.
यासोबतच ऑस्ट्रेलियासोबतचा जुना हिशोबही भारताने चुकता केला आहे. यापूर्वी अनेकदा आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया भारताच्या मार्गातील मोठा अडथळा ठरले आहेत. पण यावेळी भारताने उपांत्य सामन्यातच ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार केला आहे.